शाळेत असताना ठीक होते ,
वय थोडे लहान होते ,
भिजायला आवडायचे , नंतर मार खाऊनही.
दुसर्या दिवशीही तोच क्रम दररोज तोच पराक्रम
शाळा संपली आणि कॉलेजला गेलो पहिल्या वर्षीच नापास झालो
कॉलेज थोडे दूर होते मित्र हि भरपूर होते
पाऊस जरा थांबला होता पाण्याने रस्ता भरला होता
काल चिखल रस्त्याची दृष्ट काढीत होता
छत्र्यांचे इंद्रधनुष्य सौंदर्य खुलावीत होता
ती येत होती आणि मैत्रीणीना सांगत होती
मैत्रिणी तिला समजावत होत्या ,
बहुदा हळू हळू चालत होत्या ती जवळ आली मोगरा पसरला ,,,
आमची नजर नजर झाली आणि तिचा पाय घसरला ,
मी तिला हलकेच झेलालो सर्व गप्पच राहिले
कुणी बोलले नव्हते कुणी चालले नव्हते सारे जणू स्थिरावले होते ,
ती माझ्या खुशीमध्ये होती , तो क्षण थांबला होता ,
चेहऱ्यावर निसर्ग खुलला होता ! एक मादक गंध पसरला होता !!!!!!!!!
दोघांचे डोळे स्थिरावले , एकमेकांना पाहत राहिलो !
फक्त श्वासाचाच आवाज येत होता , आणि वारा त्याला साथ देत होता !
आपले मित्रच खरे शत्रू असतात , विनाकारण मध्येच बोलत असतात !
कुणीतरी हाक मारली तिला , लगेच ती शुद्धीत आली !
तिने स्वारी म्हंटले आणि मीही ओके म्हंटल
मी उभाच होतो , ती माघे पाहत जात होती
ती परत फिरून आली
तिच्या डोळ्या खेरीज दुसरीकडे नजर नव्हती
ती गेली आणि प्रियसी होऊन परत आली !!!!!!
तेवढ्यात आईने हाक मारली मग , पुन्हा डोळे उघडून पाहिलं










